Wednesday, April 15, 2026
Homeबीडखेळता-खेळता झोक्याने घेतला चिमुकलीचा जीव..

खेळता-खेळता झोक्याने घेतला चिमुकलीचा जीव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-लहान बहिणीसह झोक्याचा खेळ खेळत असतांनाच अचानकपणे गळ्याला फास आवळून एका नऊ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास बीड जिल्ह्याच्या माजलगाव शहरात घडली.वृंदा समीर रुद्रवार वय ९ वर्षे,रा.खंडोबा मैदान परिसर,माजलगाव,जि.बीड असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव असून ती ईगलवुड शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होती.अचानक घडलेल्या घटनेने रुद्रवार परिवारावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नऊ वर्षीय वृंदा आज सकाळच्या सुमारास तिच्या लहान बहिणीसह घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या झोक्यावर(दोरीचा पाळणा)खेळत होती.दरम्यान,खुर्चीवर चढून झोका हातात घेत असतांना खुर्ची खाली पडली आणि वृंदाला झोक्याचा गळफास बसला.गळफास बसताच वृंदाचा जागीच मृत्यू झाला.बराच वेळ होऊनही मुलगी जेवण करण्यासाठी खाली कां आली नाही? हे पाहण्यासाठी तिची आई वरच्या मजल्यावर गेली असता मुलगी गळफास बसलेल्या अवस्थेत दिसून आली. मुलीला पाहून आईने एकच आक्रोश केला.आवाज ऐकून आजी,आजोबा व  वडिलांनी धाव घेत तात्काळ वृंदाला रुग्णालयात नेले.तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तपासणीअंती डॉक्टरांनी वृंदाला मृत घोषित केले. चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूने रुद्रवार कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!