- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील कन्हान नदीच्या पात्रात मित्रांसोबत आंघोळ करतांना एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारच्या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.लक्की शंकर बोपचे वय १३ वर्षे,रा.शिवनगर, गल्ली क्रमांक-४,कन्हान,ता.पारशिवनी,जि.नागपूर असे नदीत बुडून मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो कन्हान येथील धर्मराज विद्यालयात इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेत होता.
सोमवारच्या सायंकाळी लक्की हा त्याच्या चार मित्रांसह कन्हान शहरालगत वाहणाऱ्या कन्हान नदीच्या तीरावर फिरायला गेला होता.सर्व मित्र नदीपात्रात आंघोळ करू लागल्याने लक्कीदेखील पाण्यात उतरला.काही वेळाने खोल पाण्यात गेल्याने तसेच पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला.लक्की गटांगळ्यात खात बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे सर्व मित्र जोरजोरात आरडाओरड करीत नदीच्या काठावर आले.क्षणात लक्की पाण्यात दिसेनासा झाला.माहिती मिळताच ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने त्याचा पाण्यात शोध घेतला.काही वेळात त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले. लक्कीला पण्याबाहेर काढून तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.घटनेच्या दिवशी लक्कीचे आई-वडील लग्नासाठी गोंदियाला गेले होते.दुर्घटनेची माहिती मिळताच ते तातडीने कामठी येथे पोहोचले, रुग्णालयात मुलाचा मृतदेह पाहताच आई-वडील आणि बहिणीने हंबरडा फोडला.दरम्यान,पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
- Advertisement -

