Wednesday, April 15, 2026
Homeबीडतहसीलदाराचा खतरनाक कारनामा; चिठ्ठीवर लिहिले आकडे अन् म्हणाला 'अजून तीन टाका नं'..

तहसीलदाराचा खतरनाक कारनामा; चिठ्ठीवर लिहिले आकडे अन् म्हणाला ‘अजून तीन टाका नं’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-जिकडे पाहावे तिकडे अनेकजण वरच्या कमाईच्या मागे लागलेले दिसून येतात.त्यातच,काहीजण स्वतःहून पैश्याचे आमिष दाखवतात.तर काहीजण ‘आम्ही कशाला पैसे देऊ,त्यांना पगार कमी पडतो कां? असे म्हणत एखादे शासकीय काम करवून घेण्याचे पैसे देण्याचे टाळतात.मात्र,काम न करता एखादा पक्काच पैसे खाण्यात पटाईत असेल तर त्याची वाट लावण्यात सर्वसामान्य लोकं मागे पुढे पाहत नाही आणि तसेच झाले एका प्रकरणात.महत्वाचे म्हणजे,काही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाला तरी शोभेल अशी वर्तवणूक करणे आवश्यक आहे.हल्ली राज्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या लाचेची प्रकरणे गाजत असतांनाच चक्क एका तहसीलदाराचा खतरनाक कारनामा काल शुक्रवारी बीड जिल्ह्यात उघडकीस आला.बीड जिल्ह्याच्या परळी येथील तहसीलदाराने सॉल्वन्सी म्हणजेच ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.तीनदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता.मात्र,संशय आल्याने तहसीलदाराने लाच स्वीकारली नाही.अश्यातच लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.व्यंकटेश मुंडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे.
विशेष बाब म्हणजे,बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त होताच पडताळणीवेळी व्यंकटेश मुंडे यांनी चिठ्ठीवर लाचेचे ५०,नंतर २५ असे आकडे लिहून लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान,तक्रारदाराने २० हजार देतो,असे म्हणताच ‘अजून तीन टाका नं’ असे म्हणत २३ हजारांची मागणी केली.यानंतर तीन वेळा लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता.मात्र,संशय आल्याने मुंडे यांनी लाच स्वीकारली नाही.एसीबीने त्यांच्या जवळील साधारण ८० हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले.दरम्यान, तहसीलदार मुंडे यांना ताब्यात घेतल्यानंतर एसीबीने त्यांच्या नांदेड येथील यशोविहार भागातील घराची झाडाझडती घेतली.झडती दरम्यान पोलिसांना तब्बल १३ तोळे सोने आणि ५५ हजार रूपये आढळून आल्याने जप्त केले.तहसीलदार व्यंकटेश मुंडे नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या लक्ष्मीची कामे पटकन करण्यात व्यस्त असायचे.त्यामुळे,सदरची कारवाई होताच तहसील परिसरात उपस्थित ग्रामस्थांनी फटाके फोडत आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!