Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरअंगणात शौचास बसलेल्या चार वर्षीय मुलाला बिबट्याने नेले उचलून- एक किलोमीटर अंतरावर सापडला मृतदेह-...

अंगणात शौचास बसलेल्या चार वर्षीय मुलाला बिबट्याने नेले उचलून- एक किलोमीटर अंतरावर सापडला मृतदेह- चंद्रपूर जिल्ह्यातील घटना 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील बोरमाळा येथे काल २९ मार्च रोजी बुधवारी सायंकाळी हृदयद्रावक घटना घडली असून अंगणात शौचास बसलेल्या एका चार वर्षीय मुलाला बिबट्याने आपल्या जबड्यात उचलून नेत ठार केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

हल्ली उन्हाळा सुरू झाल्याने पाण्यासाठी भटकंती करीत जंगलातील प्राणी गावाकडे येऊन मानवी संघर्षात वाढ होण्याची दाट शक्यता बळावली आहे.अशातच काल बुधवारी घरासमोरील अंगणात शौचास बसलेल्या मुलाला बिबट्याने आईच्या डोळ्यासमोर उचलून नेले.आईच्या डोळ्यादेखत ही घटना घडली.बिबट्या मुलाला नेत असल्‍याचे पाहून आईने हंबरडा फोडला.यावेळी आजूबाजूचे नागरीक गोळा झाले.परंतु, मुलाला वाचविता आले नाही. 

सावली तालुक्यातील बोरमाळा येथे काल बुधवारी २९ मार्च रोजी संध्याकाळी ही घटना घडली.हर्षद कारमेंगे असे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.आईच्या डोळ्या देखत घटना घडल्याने एकच टाहो फोडला.गावातील नागरिकांनी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केला मात्र काल थांगपत्त लागला नाही.आज सकाळी घरापासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात त्याचा मृतदेह सापडला.सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई वन विभागातर्फे करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!