Thursday, April 16, 2026
Homeनागपूर१६ वर्षीय आणि १४ वर्षीय अल्पवयीन मुलींचे प्रेम प्रकरणातून घरातून पलायन.. -...

१६ वर्षीय आणि १४ वर्षीय अल्पवयीन मुलींचे प्रेम प्रकरणातून घरातून पलायन.. – मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने काढले शोधून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मुली जस-जश्या मोठ्या होऊ लागतात.तसे त्यांच्यातील हावभावात बदल होऊ लागतो.त्यामुळे अल्पवयीन मुलींची काळजी घेणे आवश्यक आहे. अश्यातच प्रेम प्रकरणातून घरून पलायन केलेल्या दोन अल्पवयीन मुलींना गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (एएचटीयू)शोधून जुनी कामठी व एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पहिल्या घटनेत जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्रामवरून एका युवकाच्या प्रेमात पडली. दरम्यान,क्लासला जाते असे सांगून ४ जूनला दुपारी दोन वाजता ती घराबाहेर पडली.परंतु,ती घरी न आल्यामुळे तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल केला होता.गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या निरीक्षक ललिता तोडासे, गजेंद्रसिंग ठाकूर,श्याम अंगुलथेवार,राम निरगुडवार, दीपक गिते,अश्विनी खाइपवार यांनी मिळालेली माहिती व तांत्रिक तपास केला.तपासात ही मुलगी इन्स्टाग्रामवर एका मुलाच्या संपर्कात असल्याचे समजले.त्या मुलाने तिकीट बुक करून दिल्यानंतर अल्पवयीन मुलगी उत्तर प्रदेशात गेली.दोन दिवस तेथे थांबल्यानंतर ती ९ जून २०२५ ला ड्रॅगन पॅलेस परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने तिला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन केल्यानंतर तिला जुनी कामठी पोलिसांच्या ताब्यात दिले.दुसऱ्या घटनेत एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जाते असे सांगून ११ फेब्रुवारीला एका २२ वर्षाच्या युवकासोबत निघून गेली.शाळेत जातांना ऑटोमध्येच मुलाशी तिची ओळख झाली होती.दोघेही शेगाव, राजस्थान येथे गेले.तेथून रेल्वेने ते रायपूरला परत आले.रायपूर रेल्वेस्थानकाजवळ २० ते २५ दिवस थांबल्यानंतर या मुलीने इन्स्टाग्रामवरून आपल्या भावाकडून वडिलांचा मोबाइल घेऊन त्यांना संपर्क साधून ती रेल्वेने नागपुरात आली.त्यानंतर मुलीचे समुपदेशन करून पथकाने तिला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!