Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजशेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावणाऱ्या कंपनी विरोधात जन आंदोलन छेडू- राकाँचे तालुकाध्यक्ष क्षितिज...

शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावणाऱ्या कंपनी विरोधात जन आंदोलन छेडू- राकाँचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात बडे उद्योग धंदे नसल्याने सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा व जिल्ह्यात उद्योग व्हावेत,अशी आमची इच्छा आहे.पण,उद्योगधंद्याच्या नावाखाली आमच्या पूर्वजांनी ज्याच्या भरवशावर अख्खे आयुष्य काढले,त्यातच आम्ही व आमची पुढील पिढी ज्याच्या भरवशावर राहणार, अश्या शेत जमिनी जिंदाल स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड सारख्या बड्या उद्योगांना देणे हे कितपत योग्य आहे; असे करून शासन काय साध्य करू पाहते.विकासाच्या नावाखाली बाता मारणे शासनाने सोडावे,असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट)
देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांनी परखड मत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावणाऱ्या कंपनी विरोधात जन आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.
देसाईगंज तालुक्यातील खासगी व सरकारी अशी एकूण २ हजार ३०३ हेक्टर जमीन जिंदाल स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड सारख्या बड्या उद्योगांना देण्याच्या शासनाच्या हालचालींना वेग आला आहे.यात कुरुड,कोंढाळा,नैनपुर,तुळशी, कोकडी,काही प्रमाणात देसाईगंज शहर व इतर क्षेत्र भू-संपादित करण्यात येणार आहे.त्यामुळे ज्या शेत जमिनी शेतकऱ्यांच्या एकमेव आधार आहेत,त्या उद्योगांना देणे म्हणजे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे आहे.माहितीनुसार,कंपनी एकाला नोकरी वा काही लाख रुपयांची रक्कम देणार,पण अशी धन- दौलत किती दिवस पुरणार आहे.स्थायी आणि अस्थायी यात फरक आहे.मिळणाऱ्या मोबदल्यावर आम्ही लवू-लवू खाणार,पण उद्याचे भविष्य काय?शासनाला उद्योग धंद्याची इतकीच चिंता आहे,तर ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आले आहेत,अश्या ठिकाणी वा जिथे कुठलाही अधिवास नाही,अश्या जागा शोधून त्या ठिकाणी उद्योग उभारा, उद्योग धंद्यांना आमचा विरोध मुळीच नाही.मात्र,ज्यामुळे आमचे अनादिकाळापासून सुजलाम-सुफलाम झाले व पुढील काळातही सुजलाम-सुफलाम होणार,अश्या ठिकाणी उद्योगांचा विचार करणे हे कदापिही सहन करणार नाही,यासाठी येत्या काळात मोठा जन आंदोलन उभारू व शासनाला त्यांची जागा दाखवू,असे परखड मत क्षितिज उके यांनी व्यक्त केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!