- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-प्रशासनाच्या वतीने सर्वत्र भर दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान घराबाहेर पडू नये,महत्वाचे कामच असेल तर उन्हात जातांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करणे,पुरेसे पाणी पिणे आणि हलके कपडे वापरणे आदी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यातच,सध्या उन आणि अवकाळी पावसाचा खेळ सुरू असल्याने पाऊस संपताच आणखी प्रखर उन जाणवत आहे.त्यामुळे उष्माघात होऊन अचानकपणे मृत्यू होण्याच्या घटना राज्याच्या विविध भागात उघडकीस येत आहेत.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी गेल्याची घटना उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,४७ वर्षीय इसम हॉटेलमध्ये पेपर वाचत असतांनाच अचानकपणे खाली कोसळला.लागलीच उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतांना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावच्या बसस्थानक परिसरात काल बुधवारच्या भर दुपारी घडली.प्रकाश आत्माराम मेंढे वय ४७ वर्षे, रा.ढोलसर,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे मृतकाचे नाव असून ते गावच्या बसस्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये पेपर(वृत्तपत्र)वाचत होते.त्याचवेळेस सदरची दुर्दैवी घटना घडली.प्राथमिक तपासणीत प्रकाश मेंढे यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दुपारच्या सुमारास बाहेर पडतांना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

