Thursday, April 30, 2026
Homeदेसाईगंजहजारोच्या संख्येने बौद्ध बांधव धडकले देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर... - बुद्धगया येथील महाबोधी...

हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव धडकले देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर… – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही.ते बौद्धांच्याच ताब्यात असावे,यासाठी आज,मंगळवार १८ मार्च रोजी देसाईगंज येथे अखिल भारतीय भिख्खू संघाच्या वतीने भव्य जन आक्रोश शांती मार्च काढण्यात आला.या आंदोलनांतर्गत देसाईगंज तालुक्यातील हजारो बौद्ध बांधव उपविभागीय कार्यालयावर धडकले.भव्य जन आक्रोश शांती मार्च सर्वप्रथम शहरातील दीक्षाभूमी या ठिकाणाहून मुख्य मार्ग,फवारा चौक ते उपविभागीय कार्यालय या ठिकाणी धडक देत उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले व बौद्ध बांधवांसह अखिल भारतीय भिख्खू संघाच्या वतीने
उपविभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा पावित्रा घेण्यात आला आहे.इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले.शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली,तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई १९९२ पासून आंदोलन करीत आहेत.सध्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी सर्वत्र संघटना आक्रमक झाल्या आहेत.
प्रमुख मागण्या👇
बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा,बुद्धगया मंदिर व्यवस्थापन कायद्यात सुधारणा करावी,महाबोधि विहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदूंऐवजी बौद्ध समाजाच्या हाती सोपवावे,यासाठी आंदोलन केली जात आहेत.यासंदर्भात देसाईगंज उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार विलास तुपट यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपतींना बौद्ध बांधव तथा अखिल भारतीय भिख्खू संघाचे भंते यांच्या वतीने मागण्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
भव्य जन आक्रोश आंदोलनाचे व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!