Wednesday, July 15, 2026
Homeभंडारासहलीच्या आनंदावर विरजण; एकाचा जलाशयात बुडून मृत्यू..

सहलीच्या आनंदावर विरजण; एकाचा जलाशयात बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रंगपंचमीनिमित्त नागपूरहून सहलीचा आनंद लुटण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील रावणवाडी जलाशयात गेलेल्या तरुणांची बोट उलटून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.तब्बल चोवीस तासांच्या शोधमोहिमेनंतर आज,बुधवार ४ मार्च रोजी तरुणाचा  मृतदेह जलाशयात सापडला.सौरभ मेहरा वय ३० वर्षे, रा.धरमपेठ,नागपूर असे मृत तरुणाचे नाव आहे.
नागपूरहून काही तरुणांचा गट काल मंगळवारी सहलीसाठी रावणवाडी जलाशयावर गेला होता.विशेष म्हणजे,होळी आणि रंगपंचमीनिमित्त जलाशय पर्यटकांसाठी बंद असतांनाही,आदेशांचे उल्लंघन करून हे पर्यटक जलाशयात उतरले होते.जलाशयात बोटिंग करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बोट अनियंत्रित झाल्याने ती अचानक उलटली.सौरभला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला,तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी पोहत-पोहत
किनारा गाठल्याने त्यांचे प्राण वाचले.घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशनचे एपीआय धनंजय पाटील पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.स्थानिक मच्छीमार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शोधमोहिम राबविण्यात आली.अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत आज सकाळी शोधमोहीम सुरू केली असता सौरभचा मृतदेह सापडला.घटनेने मेहरा कुटूंबीय शोकसागरात बुडाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!