Thursday, July 30, 2026
Homeनागपूरसतत मोबाइल पाहण्यामुळे आईने रागावले; मुलाने घरच सोडले.. - अखेर गुन्हे शाखेच्या...

सतत मोबाइल पाहण्यामुळे आईने रागावले; मुलाने घरच सोडले.. – अखेर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने लावला शोध…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कुणाच्याही आई-वडिलांना नेहमीच वाटत असते की,आपली मुले सुशिक्षित होऊन आई- वडिलांचे मोठे नाव लौकीक करावीत; त्यासाठी सर्वकाही पणाला लावून सांभाळ करीत असतात.अशातच आजची तरुणाई छोट्या-छोट्या कारणांसाठी टोकाचे पाऊल उचलून जन्मदात्यांना त्रास देत असल्याच्या घटना हल्ली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.अश्याच प्रकारची घटना नागपुरात उघडकीस आली आहे.
आई-वडिलांनी मोबाइलसाठी रागावल्यामुळे एका १६ वर्षीय मुलाने घरून पलायन केले.परंतु गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ३९ वर्षीय व्यक्तीचा १६ वर्षीय मुलगा १२ वीला शिकतो.तो सतत मोबाइल पाहत असल्यामुळे त्याच्या आईने त्याला फटकारले.त्याचा राग मनात धरून तो १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता घरी कोणाला काहीही न सांगता निघून गेला.त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेले असावे, अशा तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी मिळालेल्या माहितीवरून व तांत्रिक तपास करून या अल्पवयीन बालकाचा शोध घेतला असता तो बिडगाव येथे आढळला.त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर या अल्पवयीन बालकाला वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या निरीक्षक ललिता तोडासे आणि त्यांच्या पथकाने केली.रागाने घरून निघून जाण्याची अल्पवयीन बालकाची ही दुसरी वेळ आहे. महिनाभरापूर्वीही तो घरच्यांनी रागावल्यामुळे निघून गेला होता.त्यावेळी दोन दिवस त्याने एका कॅन्टीनमध्ये काम केले होते.लहान असतांना त्याला कावीळ झाला होता.तेव्हापासून तो मतिमंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!