- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल योजनेचा लाभ दिला जाणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना डावलून प्रतीक्षा यादीतील मर्जीच्या लोकांना देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप देसाईगंज तालुक्याच्या एकलपूर येथील संजय दादाजी नाकतोडे यांनी केला आहे.नाकतोडे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये फेरफार केल्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.याबाबत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान सह मुख्य कार्यकारी अधिकारी,आमदार मसराम,संवर्ग गट विकास अधिकारी देसाईगंज यांना नुकतीच तक्रार दाखल केली आहे.
देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायत एकलपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेची यादी सन २०१०-११ च्या जनगनेनुसार तयार करण्यात आली.त्यानुसार ग्रामसभा घेऊन गावातील गरजू व्यक्तींना सर्वप्रथम घरकुलाचे लाभ देण्याचे ठरले व त्यानुसार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र,सध्याच्या घडीला प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीतील घरकुले क्रमानुसार न देता आपल्या जवळच्या व्यक्तींना सर्वप्रथम लाभ देण्यात येत असल्याचा आरोप एकलपूर येथील ग्रामस्थ संजय नाकतोडे यांनी केला आहे.त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करून गरजू व्यक्तींना लाभ देण्याची मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
- Advertisement -

