Monday, August 10, 2026
Homeचंद्रपूरशेतकरी बांधवांना त्वरित पिक कर्ज वाटप करण्यात यावे- राकाँचे ज्येष्ठ नेते आबीद...

शेतकरी बांधवांना त्वरित पिक कर्ज वाटप करण्यात यावे- राकाँचे ज्येष्ठ नेते आबीद अली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नितेश केराम/कोरपना ता.प्र.

कोरपना :- शेतकरी बांधवांच्या अडचणी व समस्या लक्षात घेता आगामी हंगामासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी पिक कर्ज वाटप कार्यक्रम त्वरित घेण्यात यावा; अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते आबीद अली व शेतकरी बांधवांनी केली आहे.

शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम मार्च ते एप्रिल पासून संपला आहे.पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बांधव पुढे सरसावला आहे नांगरनी,वखरनी,बियाणे खरेदी व शेत मजुरांना मजुरी अदा करण्यासाठी शेकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे.यंदाच्या हंगामात कापसाला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.कशी-बशी बसे जुडवा- जुडव करून मार्च महिन्यात आपले मागील वर्षाचे पिक कर्ज भरले आहेत.त्यामुळे त्यांच्याकडे आता दमडी सुद्धा उरली नाही.सोयाबीन, तूर,हरभरा व इतर शेत माल विक्रीतही शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी आर्थिक अडचणींचा सामना व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त होऊन कसे-बसे उदरनिर्वाह करून जीवन जगीत आहेत.तसेच विवाह सोहळे,बोरवण कौटुंबिक  कार्यक्रम आगामी काळात येऊन ठेपले आहेत.अशा परिस्थित शेतकऱ्यांनी काय करावे?अशी स्थिती निर्माण झाली आहे.बरेच शेतकरी बांधव यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत.त्यामुळे शासनाने शेतकरी बांधवांच्या अडचणी व समस्या लक्षात घेता राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज त्वरित देण्यासाठी निर्देश द्यावे व शेतकरी बांधवांच्या अडचणी दूर करावीत अशी मागणी राकाँचे ज्येष्ठ नेते आबीद अली व शेतकरी बांधवांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!