Saturday, May 30, 2026
Homeगोंदियाशेतकरी गेला आपबिती सांगायला अन भलतेच सांगितले साहेबाने...! ईटीयाडोह...

शेतकरी गेला आपबिती सांगायला अन भलतेच सांगितले साहेबाने…! ईटीयाडोह पाटबंधारे विभागातील प्रकरण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया:- आमगाव तालुक्यातील बनगाव येथील शेतकरी शेतात कालव्याचे पाणी पोहोचत नसल्याने याची तक्रार करण्यासाठी ईटीयाडोह पाटबंधारे विभागाच्या शाखा व्यवस्थापकाकडे गेले असता; त्यांनी उपाययोजना सूचविण्याऐवजी शेतात पाणी पोहोचत नसेल तर शेती कशाला करता? असा अजब-गजब सल्ला दिल्याने शेतकरी बांधव नाराज होऊन संताप व्यक्त करीत आहेत.

शेतकरी बांधव खरीप हंगामासह रब्बी हंगामात सुद्धा शेतीची मशागत करीत असतात.यंदा ४५ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली.मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्येसुद्धा पुरेसा पाणीसाठा आहे.त्यामुळे अनेक शेतकयांनी रब्बी विभागाच्या कालव्याद्वारे पाणी दिले जाते.पण काही शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांचा रब्बी हंगाम संकटात आला आहे.बनगाव येथील शेतकरी सुखराम थेर यांच्या शेतात कालव्याचे पाणी पोहोचत नाही त्यामुळे या संदर्भात त्यांनी संबंधित ईटीयाडोह व्यवस्थापन अधिकाऱ्यांना तक्रार केली.

त्यानंतर शाखा अभियंता आणि कालवा निरीक्षक यांनी थेर यांच्या शेतीला भेट दिली.शेतात पाणी जाण्यासाठी जवळ मोंगाड पायली बसविण्याची परवानगी द्यावी किंवा पंप बसवून शेतीची लागवड करण्याची मुभा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु अधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केली व उलट शेतकऱ्याला शेती कशाला करता? असा अफलातून सल्ला दिल्याचे शेतकरी सुखराम थेर यांनी सांगितले.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून सदर प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे थेर यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर क्रत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!