- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली(रेशन)अंतर्गत गव्हासोबत किंवा काही प्रमाणात गव्हाऐवजी मक्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र,या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक रेशनधारकांसमोर नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत. रेशन दुकानातून मिळणारा मका दळण्यासाठी लाभार्थी स्थानिक आटा चक्क्यांवर जात असतांना अनेक चक्कीचालकांकडून मका दळण्यास नकार दिला जात असल्याची तक्रार समोर आली आहे.चक्कीचालकांचे म्हणणे आहे की,मक्याचे दाणे अधिक कठीण असल्यामुळे दगडी चक्की किंवा सर्वसाधारण गिरणीचे दगड व पाते खराब होण्याची शक्यता असते.तसेच चक्की जाम होणे,पीठ व्यवस्थित न होणे आणि यंत्राचे नुकसान होण्याचा धोका असल्याने मका दळणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.यामुळे रेशनधारकांची मोठी गैरसोय होत असून शासनाने वाटप केलेला मका वापरायचा कसा? असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे,मका दळण्यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा विशेष चक्क्यांची माहितीही अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.त्यामुळे,रेशन दुकानातील मक्याचे करायचे काय? हे शासनानेच ठरवावे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.काही ठिकाणी मक्याची विक्री केल्या जात असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत.हे खरे असले तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या समस्यांचे काय?काही जणांच्या जेवणातील पोळी गायब झाल्याने मक्याचा ढासला खायचा काय?असा विचार अनेकांच्या मनात घर करून राहिला आहे.
- Advertisement -

