- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-पावसाच्या पाण्याने विहिरी तुडूंब भरुन गाळ,कचरा व इतर साहित्य पडून सडलेले असतात. त्यातच पाण्यामुळे काही कारणास्तव विहिरीतील मोटर पंप बंद पडत असतात.अशीच विहिरीतील मोटर पंप दुरुस्तीसह बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या एका इसमाचा विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार १३ जुलै रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास लाखनी तालुक्यातील महेगाव मार्गावरील शेत शिवारात घडली.छगन बाळकृष्ण गोटेफोडे वय ४३ वर्षे रा.पालांदूर असे मृताचे नाव असून तो मोटार पंप दुरुस्तीचे काम करायचा.
महेगाव येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीतील मोटारीमध्ये बिघाड झाला होता.तो बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्यांनी पालांदूर येथील छगन गोटेफोडे यांना बोलविले होते.आज रविवारी पहाटेच्या सुमारास छगन गोटेफोडे हे विहिरीत उतरुन मोटार दुरुस्तीचे काम करीत होते.दरम्यान,विहिरीतील विषारी वायुमुळे त्यांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला.घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांना विहिरीत विषारी वायू असल्याचा संशय आल्याने विहीरीत पेटता टेंभा टाकल्याने तो विझला. त्यानंतर कोंबडीचे पिल्लू टाकले असता पिल्लू बेशुद्ध झाले.लागलीच उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती पालांदूर पोलिसांना दिली.माहिती मिळताच पालांदूरचे पोलीस निरीक्षक सतीश बन्सोड ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.लगेच लाखनीचे तहसीलदार धनंजय देशमुख, अग्निशामक दलाचे समीर गणवीर सह कर्मचारी व स्थानिक पोलिसांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या छगन गोटेफोडे याचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी लाखनी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.घटनेचा अधिक तपास पालांदूर ठाण्याचे पोलिस हवालदार देवेंद्र मासुरकर करीत आहेत.
- Advertisement -

