चंद्रपूर :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावत संपूर्ण जिल्हा जलमय करून सोडला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.अश्यातच चंद्रपूर शहराला लागून असलेल्या झरपट नदीवरील पुल मुसळधार पावसाने तुटून वाहू लागल्याने पठाणपुरा आणि भिवापूर या दोन महत्त्वाच्या वार्डातील नागरिकांचा थेट संपर्क तुटला आहे.मात्र,पुल तुटत असतांना सदरच्या मार्गावरून रहदारी सुरू नसल्याने एखादा अनुचित प्रकार टळला. सदरचा पुल केवळ वाहतुकीसाठीच नाही,तर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यांच्या यात्रेदरम्यान भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहतूक वळवली जाते,त्यामुळे या पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना केले आहे. त्यासंदर्भात तसे पत्रही दिले आहे.
मुसळधार पावसाने पुल तुटला; अनुचित प्रकार टळला..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

