Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरमुसळधार पावसाने पुल तुटला; अनुचित प्रकार टळला..!

मुसळधार पावसाने पुल तुटला; अनुचित प्रकार टळला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावत संपूर्ण जिल्हा जलमय करून सोडला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.अश्यातच चंद्रपूर शहराला लागून असलेल्या झरपट नदीवरील पुल मुसळधार पावसाने तुटून वाहू लागल्याने पठाणपुरा आणि भिवापूर या दोन महत्त्वाच्या वार्डातील नागरिकांचा थेट संपर्क तुटला आहे.मात्र,पुल तुटत असतांना सदरच्या मार्गावरून रहदारी सुरू नसल्याने एखादा अनुचित प्रकार टळला. सदरचा पुल केवळ वाहतुकीसाठीच नाही,तर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यांच्या यात्रेदरम्यान भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहतूक वळवली जाते,त्यामुळे या पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना केले आहे. त्यासंदर्भात तसे पत्रही दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!