Tuesday, July 7, 2026
Homeभंडारामक्याच्या शेताला अचानक आग लागली; आग विझवायला धावला..पण जीवच गेला

मक्याच्या शेताला अचानक आग लागली; आग विझवायला धावला..पण जीवच गेला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शेतात राबराब-राबून मक्याचे पीक घेतले.पण, अचानकपणे शेतात आग लागल्याने ती विझवत असतांनाच एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा आगीच्या कचाट्यात सापडल्याने होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरालगतच्या शेतशिवार परिसरात घडली.रामदास गोखलू निंबेकर वय ६५ वर्षे, रा.तलाव वॉर्ड,साकोली,जि.भंडारा असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून सदरची आग ही वणव्यामुळे लागली की अन्य कारणामुळे,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सध्या तीव्र उन्हाचे दिवस असल्याने जंगल परिसरात तसेच इतर ठिकाणी अचानकपणे आग लागण्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.अश्याच प्रकारे शेतकरी रामदास निंबेकर हे शेतावर असतांनाच आगीने रौद्ररूप धारण केले.आगीमुळे शेतातील मका पीक नष्ट होणार यासाठी त्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र,संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने रामदास हे सुध्दा त्यात अडकले आणि मृत पावले.दरम्यान,परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी धावपळ केली.मात्र आगीच्या भडक्यात सापडलेल्या शेतकऱ्याला वाचविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी साकोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!