Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरभीषण कार अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू; तर चारजण गंभीर जखमी..

भीषण कार अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू; तर चारजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-परतीच्या प्रवासात असलेल्या कारचा भीषण अपघात होऊन कारखाली दबून राहिल्याने १२ वर्षीय चिमुकलीसह चार महिलांचा जागीच मृत्यू झाला,तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार २५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ घडली.अक्सा शबरीन शेख वय १२ वर्षे,सलमा बेगम झांकीर हुसेन वय ४६ वर्षे,अफजल बेगम वय ५५ वर्षे, सायरा बानो वय ४५ वर्षे यांचा जागीच मृत्यु झाला तर शाहीन निशा वय ३७ वर्षे,नजत बेगम वय ४८ वर्षे, नुसरत बेगम वय ४५ वर्षे व अब्दुल्ल अरहान अशी गंभीर जखमींची नावे असून २८ वर्षीय कार चालक अब्दुल रहमान आश्चर्यकारकरित्या सुखरूप बचावला आहे.अपघातातील मृतक व जखमी हे तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील रहिवासी असून ते  नागपुर येथील नातेवाईक यास्मीन बानो यांच्या भेटीकरीता तसेच इतर कामांसाठी गेले होते.
नागपूर येथील कामे आटोपून सर्वजण टीएस ०२ ईएन ५५४४ क्रमांकाच्या अर्टिका कारने त्यांच्या स्वगावी निघाले होते.अशातच परतीच्या प्रवासात असतांनाच  राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ येताच पहाटे दीड वाजेच्या दरम्यान कार चालकाच्या डोळ्यावर झापड (डुलकी)आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलावरून थेट नाल्यातील खड्ड्यात कोसळली. अपघात इतका भीषण होता की,कोसळलेल्या कारचा आवाज सोंडो गावापर्यंत ऐकू आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ घटनेची माहिती राजुरा पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले.मात्र, उंचावरून कोसळलेली कार उलटी असल्याने कार मधुन जखमींना बाहेर काढणे अशक्य झाले. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लीवार व पथकाने  महामार्ग निर्माण कंपनीच्या सहकार्याने कटरच्या सहाय्याने कारचा काही भाग कापुन जखमींना बाहेर काढले.तोपर्यंत चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर चार जण गंभीर जखमी झाले.प्रकरणी राजुरा पोलिसांनी अपघाताची नोंद घेत मृतांचे शव उत्तरीय तपासणीसाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तर प्राथमिक उपचारानंतर जखमींना चंद्रपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकरणी चालक अब्दुल रहमान याच्यावर कलम २८१,२२५(बी),१०६(१) बीएनएस तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लीवार करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!