Wednesday, July 15, 2026
Homeबीडभीषण अपघातात तहसीलदाराचा मृत्यू..!

भीषण अपघातात तहसीलदाराचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनावरील अचानकपणे नियंत्रण सुटून बीड जिल्ह्याच्या केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.सदरची दुर्घटना ही लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ घडली.एका कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाने राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महसूल विभागाने शोक व्यक्त केला आहे.
आज पहाटेच्या सुमारास तहसीलदार राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते.पहाटे पाचच्या  सुमारास रेणापूर फाट्याजवळ येताच त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले.यात कार रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाली.अपघाताची तीव्रता इतकी बिषण होती की,त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताच्या वेळी गाडीत ते एकटेच होते.पहाटेची  वेळ असल्याने परिसरात फारशी वर्दळ नव्हती.मात्र, अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला आहे.दुर्दैवी घटनेमुळे प्रशासन आणि स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना...

मधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 'मध...

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!