- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-भंडाराच्या राष्ट्रीय महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेलसमोर काल,रविवारच्या रात्री बोलेरो कार आणि ट्रकचा भीषण अपघात घडला असून अपघातात पाच पैकी चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.गंभीर जखमी इसमावर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.अशोक फुलचंद देहरवाल वय ४८ वर्षे,रा.नागपूर,शैलेंद्र लेखाराम बघेल वय ३४ वर्षे,खापरी,नागपूर,शैलेश पन्नालाल गोकुळपुरे वय ४० वर्षे,एअरफोर्स नगर,मुकेश बिंजेवार वय ३२ वर्षे,वाडी,नागपूर अशी मृतांची नावे आहेत.तर गंभीर जखमींमध्ये अविनाश नाकतोडे याचा समावेश आहे.
माहितीनुसार,रायपूरहून आलेले बोलेरो कार वाहन हे नागपूरकडे जात होते.अशातच भंडारा महामार्गावरील
बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये पाचजण जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असतांना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले.यात चौघांचा जागीच मृत्यू झाला.तर चालक नाकतोडे गंभीर जखमी झाला.अपघातानंतर महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली.घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने भंडारा जिल्हा रूग्णालयात दाखल केले,तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
- Advertisement -

