Tuesday, July 28, 2026
Homeभंडारापट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना लाखनी वन विकास महामंडळाच्या किटाडी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक-३८९ मध्ये उघडकीस आली. लाखनी तालुक्यातील किटाडी जंगल शिवार व आजूबाजूच्या परिसरात मागील दोन वर्षापासून पट्टेदार वाघाची दहशत कायम आहे.वाघ नियमितपणे पाळीव जनावरांना आपले लक्ष्य करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.गिरीधर मारोती उपासे रा.तिरखुरी,ता.लाखनी,जि.भंडारा असे नुकसानग्रस्त पशूपालकाचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे काल रविवारी गिरीधर उपासे यांच्या मालकीची गाय गुरे राखणाऱ्यांच्या कळपात जंगल परिसरात चराईसाठी गेली होती.चराई करीत असतांनाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने एका गायीची शिकार केली.त्यामुळे कळपातील उर्वरित गायी भेदरून पळायला लागल्या.दरम्यान, गुराख्याने सदर घटनेची माहिती गावात दिली असता घटनाक्रम लक्षात आला.घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा करून पुढील प्रक्रिया पार पाडली.वाघाने ऐन गर्भार गायीला ठार केल्याने पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!