- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज न गरपरिषदेत भारतीय जनता पक्षाला मिळालेला ऐतिहासिक विजय हा केवळ एका व्यक्तीचा नसून,तो भाजप कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम,शिस्तबद्ध संघटन आणि जनतेने पक्षावर दाखवलेले प्रेम,त्यामुळे हा विजय जनतेच्या विश्वासाचा विजय आहे,अशी भावना देसाईगंज भाजपा तालुका अध्यक्ष सुनील पारधी यांनी व्यक्त केली.
नुकताच रविवार २१ डिसेंबर रोजी देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. देसाईगंज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या लता मुरलीधर सुंदरकर,तर भाजपाचे तब्बल १२ नगरसेवक निवडून आले.भाजपच्या लता सुंदरकर यांना ६ हजार ६४४ मते मिळाली,तर काँग्रेसच्या वनिता नाकतोडे यांना ६ हजार ०२८ मते मिळाली.केवळ ६१६ मतांच्या फरकाने सुंदरकर या विजयी झाल्या आहेत. विजयानंतर एका कार्यक्रमात संवाद साधतांना सुनील पारधी यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना आणि जनतेला दिले.ते म्हणाले की, माजी आमदार कृष्णा गजबे यांचे जनतेशी असलेले अतूट नाते आणि त्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेले काम या विजयाचे मुख्य आधार ठरले आहे.भारतीय जनता पक्षाने नेहमीच शेतकरी, शेतमजूर,युवक, महिला आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.आम्ही केलेल्या अविरत कार्याची पावती आज जनतेने मतपेटीतून दिली आहे.हा विजय केवळ जल्लोष करण्याचा नसून,आम्हाला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.प्रसंगी देसाईगंज तालुक्यातील मतदारांचे असेच प्रेम आणि आशीर्वाद भविष्यातही पक्षावर राहतील,अशी आशा सुनील पारधी यांनी व्यक्त केली.नगर परिषदेतील विजयामुळे संपूर्ण तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
- Advertisement -

