Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरदेवीचे दर्शन घेत मुख्यमंत्र्यांनी फोडला चंद्रपूर मनपाच्या प्रचाराचा नारळ.

देवीचे दर्शन घेत मुख्यमंत्र्यांनी फोडला चंद्रपूर मनपाच्या प्रचाराचा नारळ.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राज्यातील २९ महानगरपालिकांंच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी काल,शनिवार ३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून राज्यात तब्बल १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहेत.तर १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत २ हजार ८६९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.चंद्रपूर शहर महानगरपालिकेत एकूण १७ प्रभाग असून ६६  सदस्य संख्या असलेल्या पालिकेत तब्बल ४५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.अश्यातच आज,रविवार ४ जानेवारीला
राज्यभरात सर्वच महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे.यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज भव्य विजय संकल्प यात्रा काढण्यात आली.अंचलेश्वर गेट येथून निघालेल्या संकल्प यात्रेचा जटपूरा गेट येथे समारोप करण्यात आला.प्रसंगी चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फोडण्यात आला.यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ.प्रा.अशोक उईके,राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार किशोर जोरगेवार, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार देवराव भोंगळे,आमदार करण देवतळे, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव,जिल्हाप्रमुख ॲड.युवराज धानोरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरे जात आहे.चंद्रपूर शहरात मागील काही काळात हंसराज अहिर,सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात विकास झाला आहे. चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत विविध विकासकामे झाली असून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आम्ही केले आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक जनउपयोगी योजना आम्ही येथे यशस्वीपणे राबवित आहोत.आता १६ हजार घरांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा निर्णय झाला असून त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. आजच्या या विजय संकल्प यात्रेतून विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि माता महाकालीच्या दर्शनाने चंद्रपूर महानगरपालिकेत महाविजय मिळणार असून येथे महायुतीचा झेंडा फडकेल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.प्रसंगी अंचलेश्वर गेटजवळून निघालेल्या विजय संकल्प यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!