- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सध्याच्या घडीला ग्रामीण भागात तेंदूपाने गोळा करण्याचा हंगाम सुरू आहे.दरम्यानच्या काळात जंगल परिसरातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असते.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे.जंगलात वाघाच्या दहशतीत तेंदूपाने तोडावी लागतात.तेंदूपाने तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील अनेक महिला टोळीने नेहमीप्रमाणे लगतच्या जंगलात गेल्या.१० वाजताच्या सुमारास या महिला तेंदूपानांचे ओझे घेऊन घरी परत आल्या.यातील कांता बुधाजी चौधरी,शुभांगी मनोज चौधरी व रेखा शालिक शेंडे या महिला दुपार झाली,तरीही घरी न परतल्याने गावकऱ्यांनी हातात डफली घेऊन जंगल परिसरात शोध मोहीम राबवली.अशातच दोन किलोमिटर आत जंगलात गेल्यानंतर पुढील दृश्य पाहून गावकऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला.वाघीण चक्क एका महिलेच्या अंगावर बसून मांस भक्षण करत होती.हे विदारक दृश्य पाहून गावकऱ्यांनी हातातली डफली वाजवायला सुरुवात केली असता, वाघीण तेथून पळून गेली.गावकऱ्यांच्या शोधात घटनास्थळी तिघींचेही मृतदेह आढळले.सदरची घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रात शहरापासून जवळच असलेल्या जंगलात काल, शनिवारी १० मे च्या दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.कांता बुधाजी चौधरी वय ६५ वर्षे, शुभांगी मनोज चौधरी वय २८ वर्षे व रेखा शालिक शेंडे वय ५० वर्षे, तिन्ही महिला चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) येथील रहिवासी असून तेंदूपाने गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेल्या असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.एकच वेळी एकाच गावातील तिघींना वाघाने ठार केल्याची पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
- Advertisement -

