- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-आता यांना काय म्हणावे? तहसीलदारासह तलाठ्यास पगार कमी पडत असावे,त्यामुळे गौण खनिज उत्खनन प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी बल्लारपूरच्या तहसीलदारांसह तलाठ्याने तब्बल २ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याची खळबळजनक घटना काल,मंगळवारी १ एप्रिलला उघडकीस आली.याप्रकरणी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बल्लारपूरचे तहसीलदार अभय गायकवाड यांना ताब्यात घेतले,तर कवडजई येथील तलाठी सचिन पुकळे हा घटनास्थळावरून पळाल्याने शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
तक्रारदारांचा बिल्डिंग मटेरिअल सप्लायरचा व्यवसाय आहे.तसेच मौजा कवडजई गावात शेती आहे.या शेतशिवारात २३ मार्च रोजी शेतजमीन समतल करण्यासाठी मुरुम काढण्याचे काम करत होते.मुरुम उत्खननाची परवानगी नसल्याने बल्लारपूर येथील तहसीलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुकळे यांनी कारवाई टाळण्यासाठी २ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.कारवाईच्या भीतीपोटी तक्रारदाराने १ लाख १९ हजार ९०० रुपये त्यांना दिले.उर्वरित १ लाख रुपये मागणीसाठी तहसीलदार अभय गायकवाड व तलाठी पुळके यांनी तक्रारदाराकडे तगादा लावला होता.
याबाबत तक्रार त्याने लाचलुचपत विभागाकडे केली. पथकाने पडताळणी केली असता,तहसीलदार गायकवाड यांनी दिलेल्या प्रोत्साहनानुसार व तलाठी पुळके लाचेची मागणी केल्याचे समोर आले. तहसीलदार गायकवाड यांना ताब्यात घेतले असून पुकळे फरार आहे.सदरची कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,संजय पुरंदरे,सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्त्वात रोशन चांदेकर,हिवराज नेवारे, अमोल सिडाम,प्रदीप ताडाम,सतीश सिडाम आदींनी केली.
- Advertisement -

