- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-एखादा पद मिळाला म्हणून ‘मेरीच सूनो’असे पूर्वी चालत होते.मात्र,आता काळानुरूप बदल होत चालला.आजच्या घडीला सगळीकडेच एकशे एक धुरंदर लोकं आहेत.अश्यातही तुम्ही आपलीच खरी करतो म्हणाल आणि तेही प्रशासनात ते कदापिही सहन केले जाणार नाही.अश्याच प्रकारे भंडाऱ्याचे तहसीलदार संदीप माकोडे यांच्या गैरवर्तणुकीच्या चर्चाच नाही तर प्रत्यक्षातील कृतीमुळे सरपंच संघटना आक्रमक झाली असून १८ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल मंत्र्यांना निवेदन पाठवत बदलीची मागणी केली होती. अश्यातच निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने परत भंडारा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.तहसीलदार माकोडे हे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांशी व्यवहार करतांना वारंवार उद्धट व गैरवर्तनीचे वर्तन प्रदर्शित करत आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींचा अपमान होत असून ग्रामस्थांचा सन्मानही धुळीस मिळत आहे.शासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अशी वर्तणूक अस्वीकार्य आहे; असे सरपंच संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे तहसीलदार संदीप माकोडे यांची तडकाफडकी बदली करावी,सरपंच तसेच भंडारा तालुक्याच्या जनतेचा अधिकार व सन्मान अबाधित राहावा,तहसील प्रशासनात हुकूमशाही व गर्विष्ठ प्रवृत्तीला आळा घालावा,असे म्हणत संतप्त सरपंचांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारून जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन सादर केले.
- Advertisement -

