Sunday, May 24, 2026
Homeभंडाराटिप्परने दुचाकीला धडक देताच ५ वर्षाची नात व आजोबा जागीच ठार- आजची...

टिप्परने दुचाकीला धडक देताच ५ वर्षाची नात व आजोबा जागीच ठार- आजची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक देताच ५ वर्षाची नात व ७० वर्षाचे आजोबा यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज २५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

कवळू बडवाईक वय ७० वर्षे व वाणी महेंद्र बडवाईक वय ५ वर्षे दोघेही रा.नवीन पुनर्वसन पिंडकेपार (बेला) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातीचे नाव आहे.कवळू बडवाईक हे आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झाले होते.त्यांची नात वाणी ही भंडारा येथील गायत्री विद्या मंदिरात शिक्षण घेत होती.तिला दररोज सकाळी शाळेत घेऊन जाणे व सुटीनंतर तिला परत आणणे असा त्यांचा नित्यक्रम होता.दरम्यान, आज दुपारी शाळेची सुट्टी झाल्यानंतर ते वाणीला घेऊन दुचाकी क्र.एमएच ३६ टी ३७५३ ने गावाकडे जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ४९/०७०१ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.  अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी टिप्परचाल काविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!