- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे श्री संत गजानन महाराज प्रशासकीय महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाच्या हिवाळी परीक्षेत अखेरच्या पेपरला मोबाईल वापरून २२ विद्यार्थी उत्तरपत्रिका सोडवित असल्याचा प्रकार शुक्रवारी पुढे आला होता. विद्यापीठाच्या भरारी पथकाने धाड घालून या सर्व विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती.अशातच आता चक्क एमए प्रथम वर्षाच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींनाच पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्याचा प्रताप येथील केंद्रप्रमुखाने केल्याचे पुढे आले आहे. महाविद्यालयात बीए ते एमए पर्यंत शिक्षणाची सोय आहे.त्यामुळे येथे विद्यापीठाने परीक्षा केंद्र दिले
असून केंद्र अध्यक्ष म्हणून त्याच महाविद्यालयातील प्राचार्य प्रशांत वासनिक हे जबाबदारी सांभाळत आहेत. केंद्राध्यक्ष या नात्याने त्यांनी नियमानुसार परीक्षा केंद्र चालविणे अपेक्षित होते; मात्र, याठिकाणी भलताच प्रकार उघडकीस आल्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ होऊ लागला आहे.
- Advertisement -

