- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २ मे रोजी सकाळच्या सुमारास
साकोली तालुक्याच्या बाम्पेवाडा मार्गावर घडली. अमरदीप वलथरे वय ३१ वर्षे,मनोज जांभुळकर वय ५५ वर्षे,दीपक वलथरे वय २८ वर्षे व भजनदास बांबोर्डे वय ६५ वर्षे,सर्वजण साकोली तालुक्याच्या बाम्पेवाडा येथील रहिवासी असून जखमींना तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यातील तिघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले,तर एका जखमीला किरकोळ दुखापत असल्याने प्राथमिक उपचारांनंतर सुट्टी देण्यात आली.जखमी दुचाकीस्वार दोन वेगवेगळ्या दुचाकीने बाम्पेवाडा येथून साकोलीकडे निघाले असता गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर अचानक रानडुकरांचा कळप रस्त्यावर आला. दरम्यान,वेगात असलेल्या दोन्ही दुचाक्या थेट त्या कळपावर जाऊन धडकल्या.यात चारही जण रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले.घटनास्थळी एमएच-४०-एम-८५५३ क्रमांकाची दुचाकी आढळून आली असून दुसऱ्या दुचाकीचा तपास सुरू आहे.
- Advertisement -

