Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरघरगुती वादातून विवाहित महिलेने नदीत उडी मारून केली आत्महत्या..

घरगुती वादातून विवाहित महिलेने नदीत उडी मारून केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील सास्ती येथील एका विवाहित महिलेने घरगुती वादातून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहे.शीतल प्रशांत मुळे वय ३८ वर्षे,रा.सम्राट चौक, बालाजी वॉर्ड,बल्लारपूर,जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव असून मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागल्याने शीतल ही सास्ती येथील आई-वडिलांकडे वास्तव्यास होती.विशेष म्हणजे,पाच वर्षांपूर्वी शितल ही आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त होऊन तिने बल्लापुरातील प्रशांत मुळे याच्यासोबत विवाह केला होता.अश्यातच पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती माहेरी निघून गेली होती.दरम्यान,दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता ती घराबाहेर पडली होती.बराच उशीर होऊनही शीतल ही घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणी पोलिसांनी परिसरातील माहितीच्या आधारे शोध घेत तपास सुरू केला.या दरम्यान,गावाजवळील  वर्धा नदी परिसरात पाहणी केली असता काल शनिवारी दुपारच्या सुमारास शीतलचा मृतदेह नदी पत्रातील पाण्यावर तरंगताना दिसून आला. लगेच मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.एका विवाहित महिलेने केवळ घरगुती वादामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!