Friday, May 1, 2026
Homeमुंबईआदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी ‘मॉयल लिमिटेड’ च्या महत्वपूर्ण योगदानातून...

आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी ‘मॉयल लिमिटेड’ च्या महत्वपूर्ण योगदानातून अनेक उपक्रम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -गडचिरोली,नागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई/गडचिरोली :- “आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे व त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आहे.यातून कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून या विकासासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्वपूर्ण आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.केंद्र सरकारच्या अंगीकृत मिनीरत्न ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाच्या वतीने विविध जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योगदानासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे अभिनंदन केले. “नीती आयोगाने (NITI Aayog) देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे.स्वयंसेवी संस्थाचा सहभाग व ‘मॉयल लिमिटेड’ च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील.यात सहभागी सामाजिक क्षेत्रातील जलसंवर्धन,कृषी व वन आधारित उपजीविका या क्षेत्रात बायफ संस्थेचे विकासात्मक दीर्घकालीन कार्य चांगले आहे,”असे याप्रसंगी त्यांनी नमूद केले.
‘मॉयल लिमिटेड’ने आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कामासाठी “बायफ इन्स्टिटयूट फॉर सस्टेनेबल लाइव्हवूड्स अँड  डेव्हलपमेंट (बीआयएसएलडी )” स्वयंसेवी संस्थेची निवड करत निधी उपलब्ध करून दिला आहे.ही संस्था राबवत असलेल्या उपक्रमांतून गडचिरोली जिल्ह्यातील १८ हजार कुटुंबांना आधार देण्यासाठी उपजीविकेशी संबंधित विविध उपक्रम राबवले जात आहेत.या उपक्रमांमुळे अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविका आणि जीवनमानात सुधार होईल.तसेच ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाकडून मंजूर निधीतून मार्च २०२८ पर्यंत नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ४ हजार कुटुंबांच्या उत्पन्न वाढीसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी  विविध योजना राबवल्या जाणार आहेत,पारंपरिक बोडी-आधारित शेती प्रणाली,जलसंपदा विकास आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून समुदाय-आधारित उपजीविकेला प्रोत्साहन दिले जात आहेत,असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांना या उपक्रमांसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.याबरोबर शासनाचे विविध विभाग व  स्वयंसेवी संस्थामार्फत संयुक्त सहकार्याने जिल्ह्यात कृषी,वन उत्पादने,ग्रामीण उत्पादने,पायाभूत सुविधा व व्यवस्थापन सुविधा यांचा विकास साधला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!