उद्रेक न्युज वृत्त :-अकरावी प्रवेशासाठी कॅप फेरीनंतर ओपन टू ऑल अंतर्गत विशेष फेरी प्रवेशासंदर्भातील रिक्त जागा शिक्षण विभागाकडून आज,रविवार २४ ऑगस्ट रोजी जाहीर केल्या जाणार आहेत,अशी माहिती माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी जाहीर केली.अकरावी प्रवेशासाठी जे नवीन विद्यार्थी नोंदणी करणार आहेत,तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेले; परंतु एटीकेटी असलेले जे विद्यार्थी आहेत,त्यांच्यासाठी २६ आणि २७ ऑगस्ट अर्ज भाग एकमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुभा असेल.तसेच अर्ज भाग दोन भरण्यासाठीदेखील मुभा असेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान १ ते कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयात निवडावीत.त्यापेक्षा अधिक महाविद्यालय निवडू नये,अशी स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पसंती देतांना ऑनलाइन पसंती नोंदवणे आवश्यक आहे.आतापर्यंत ओपन टू ऑल फेरीत ७८,६५७ एकूण प्रवेश झाले आहेत.तर कोटा प्रवेश ४,२१७ तर ७,४४० इतके कॅप प्रवेश झाले आहेत.
आज शिक्षण विभागाकडून राज्यातील अकरावी प्रवेशाच्या रिक्त जागा होणार जाहीर..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

