उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):- कुरखेडा तालुक्याच्या येरंडी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात आढळलेल्या अती विषारी मण्यार सापाला कुरखेडा येथील सर्पमित्रांनी जंगलात सोडले असल्याने सापाला एकप्रकारे जीवदान मिळाले आहे.
साप म्हटला की,अगोदरच अनेकांची भंबेरी उडत असते.पन्नास टक्के नागरिक हे केवळ एखाद्या सापाने दंश केल्यास घाबरल्याने मरण पावत असतात. अशातच येरंडी येथील शेतकरी मुरारी बालाजी पाटणकर यांच्या शेतात रोवणीचे काम सूरू होते. रोवणी सुरू असताना काही मजुरांना पट्टेरी साप शेतातील विहिरीमद्ये दडून असलेला आढळून आला. लगेच कुरखेडा शहरातील सर्पमित्रांना याबाबत भ्रमनध्वनीद्वारे सूचना देण्यात आली.सूचना देताच कुरखेडा येथील सर्पमित्र ताराकांत कापगते,सहकारी रोशन मेश्राम,आशूतोष दांडेकर,साहिल सहारे,गणेश चौधरी,दिक्षित बेहार,सुमित गजभिये,शिवम मांडवे यांच्यासह घटणास्थळ गाठून शेतातील विहीरीत दडून असलेल्या सापाला मोठ्या शिताफीने पकडुन त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवास असलेल्या जगंलात सूरक्षित पणे सोडत जिवदान दिले.कूरखेडा येथील सर्पमित्र चमूचे कार्य कौतूकास्पद असून तालूक्यात कूठेही साप निघाल्याची माहीती मीळताच ते स्वखर्चाने कोणताही मोबदला न घेता तातडीने घटणास्थळ गाठत निसर्गाचा मित्र असलेल्या सापांना पकडत सूरक्षित पणे त्यांना जगंलात सोडत जिवदान देत निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत आहेत

