Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजकिन्हाळा-मोहटोला गावातील समस्या संदर्भात कुणालाही देणे-घेणे नाहीच...! -स्वार्थी राजकीय संघर्षामुळे गाव अजूनही...

किन्हाळा-मोहटोला गावातील समस्या संदर्भात कुणालाही देणे-घेणे नाहीच…! -स्वार्थी राजकीय संघर्षामुळे गाव अजूनही विकासापासून कोसो दूर… -परमात्मा एक सेवाभावी संस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक डॉ.दोनाडकर यांनी खेमराज नेवारे यांना सांगितली कैफियत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून पूर्वेस अवघ्या १० किलोमिटर अंतरावर असलेल्या किन्हाळा-मोहटोला व अरततोंडी हे गांव १९९३ ला पुनर्वसित केले गेले.किन्हाळा हे गांव आदर्श गाव म्हणून पुरस्कृत आहे.या गावात सर्वच पक्षांचे राजकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात.परंतु स्वार्थी राजकीय संघर्षामुळे गाव अजूनही विकासापासून कोसो दूर आहे.गेली ३० वर्षांपासून कोणत्याच प्रतिनिधीला गावाच्या विकासात रस दिसत नाही; मग ते ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य किंवा ग्रामसेवक असो या सर्वांना कुणालाही कसलेही देणेघेणे नाही; अशी खोचक टीका परमात्मा एक सेवाभावी संस्था गडचिरोली संस्थापक तथा परमात्मा एक सेवक मार्गदर्शक यांचे प्रणेते डॉ.गोविंदराव सीताराम दोनाडकर, रा.किन्हाळा यांनी सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांच्याकडे व्यक्त केली.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे इच्छुक युवा नेता उमेदवार खेमराज नेवारे यांनी दोनाडकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी गावातील अनेक समस्या संदर्भात संवाद साधला.डॉ.गोविंदराव दोनाडकर यांनी सांगितले की,किन्हाळा-मोहटोला व परिसरातील काही भाग अजूनही विकासाची वाट पाहत आहे.गडचिरोली जिल्हा हा  आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र,आदिवासी लोकांसाठी मूलभूत सोयी- सुविधा नाही.गावातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे दगड आहेत.त्यामुळे बालक, गावातील नागरिक यांनी चालावे कसे?असा सवाल उपस्थित होतो.सार्वजनिक विहीर अनेक वर्षांपासून कोरडी पडली आहे.नळ योजना केवळ नावापुरतीच उरली आहे. नियमित पाणीपुरवठा होत नाही,त्यामुळे नागरिकांना १२ महिने पाण्याची अडचण भासते. नालीचे बांधकाम न केल्यामुळे संपूर्ण पावसाळभर रस्त्यावर २ ते ३ फुटाच्या वर पाणी साचून राहते. मोकळ्या जागेत झूडुपी जंगल तयार झाले आहे; त्यामुळे नागरिकांना सरपटणारे प्राणी यांचा नेहमीच धोका कायम राहतो; अशा अनेक अडचणी आहेत.
तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या भागात सिमेंटचे रस्ते तयार करणे,नालीचे बांधकाम करणे, पाण्याची सुविधा उपलब्ध करणे,तसेच मोकळ्या जागेची साफसफाई करणे या प्रश्नांना प्राथमिकता देऊन शासनाने लवकरात-लवकर उपाययोजना करावी अन्यथा येत्या काही दिवसांत युवा नेता खेमराज नेवारे व परमात्मा एक मार्गदर्शक डॉ.दोनाडकर यांच्या पाठिंब्याने किन्हाळा-मोहटोला व अरततोंडी येथील नागरिकांसह गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले.प्रसंगी नरेश वासनिक सह ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!