Saturday, April 18, 2026
Homeनवी दिल्लीबँकांशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे वाढली..-सर्वात जास्त फसवणूक डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून…

बँकांशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे वाढली..-सर्वात जास्त फसवणूक डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

दिल्ली :-बँकांशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे गेल्या आर्थिक वर्षात बऱ्यापैकी वाढली आहे.याची ३६०७५ पर्यंतची नोंद करण्यात आली आहे.या कालावधीत फसवणूकीतून गोळा केलेली रक्कम ४६.७ टक्क्यांनी घसरून १३९३० कोटी रुपये झाली.ही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात फसवणूकीच्या प्रकरणांची संख्या वाढून,३६०७५ पर्यंत वाढली,जी एका वर्षापूर्वी १३५६४ होती.

गेल्या तीन वर्षांत,फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये खाजगी क्षेत्रातील बँकांची सर्वाधिक फसवणूक झाली आहे; परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पूर्वीप्रमाणेच सर्वाधिक योगदान दिले आहे.सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील फसवणूक प्रामुख्याने कर्ज प्रकारात होती.आरबीआयने वार्षिक अहवालात म्हटले आहे की, डिजिटल पेमेंट,इंटरनेट आणि कार्ड पेमेंटसह सर्वात जास्त डिजिटल फसवणूक झाली आहे.

कार्ड आणि इंटरनेट संबंधित फसवणूकीची संख्या आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३५९६ होती,जी वित्तीय वर्ष २०२४ मध्ये २९०८२ पर्यंत वाढली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!