Thursday, April 30, 2026
Homeदेसाईगंजजंगली हत्तींचा कळप ऊसेगांव,कोंढाळा जंगल परिसरात दाखल…-वन विभाग देसाईगंज(वडसा) तर्फे नागरिकांनी सतर्कता...

जंगली हत्तींचा कळप ऊसेगांव,कोंढाळा जंगल परिसरात दाखल…-वन विभाग देसाईगंज(वडसा) तर्फे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- जंगलीहत्तींचा कळप देसाईगंज तालुक्याच्या ऊसेगांव जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास दाखल झाला असून कोंढाळा जंगल परिसरात जंगली हत्तींचा कळप दाखल होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने शेतकरी बांधव तसेच सरपण गोळा करणाऱ्या महिला वर्ग त्याचप्रमाणे शेत बांधावर रोवणी करणाऱ्या महिला वर्गांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वन विभाग देसाईगंज(वडसा) तर्फे आज,सोमवार दिनांक- १२ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास कोंढाळा गावातील लाऊड स्पीकरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

जंगली(रानटी) हत्तींच्या तावडीत जो सापडला तो संपला असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा,आरमोरी तसेच देसाईगंज तालुक्यात यापूर्वी तसेच हल्ली जंगली हत्तींनी धुमाकूळ घालून काही नागरिकांचा बळी घेण्यासोबतच शेत पिकांची नासधूस व अनेकांची घरे उद्ध्वस्त करून आपले अधिराज्य गाजविले आहे. अशातच वन विभागातील अधिकारी,कर्मचारी जंगली हत्तींवर पाळत ठेऊन कितीही बचाव कार्य राबवित असले तरीही सुध्दा त्यांच्या पदरी अपयश येऊन; सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी होतांना दिसून येत आहे.एखादा इसम वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्यास केवळ सांत्वन तसेच गोर-गरीब जनतेसाठी असणारी भली मोठी रक्कम अदा करण्यात येते.मात्र जिवाचे काय?तुम्ही पंख्यात बसून हवा खाताय अन् आम्ही जीवाचे रान करून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मरतोय त्याचे काय? असे जनतेमधून सुर निघू लागले असल्याने यावर कुठेतरी आळा घातला जावा; अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.तुम्ही कितीही ओरडा वा काहीही म्हणा आम्ही लक्ष घालणार नसल्याची जणूकाही शपथ वन विभागाने घेतली की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून सोडत आहे.मात्र याचे कुणाला कसलेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.मानवा पेक्षा यांचा वन्य प्राणी महत्वाचे असल्याने सदर यंत्रणा बचाव कार्यात कुचकामी झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.यावर कुठेतरी आळा घालून आपलीच पोळी शेकण्याचे काम बंद करावे; अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!