Tuesday, September 1, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली -शेतकरी बांधवांवर ओढवले मोठे संकट….

कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली -शेतकरी बांधवांवर ओढवले मोठे संकट….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज :- गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण सुरक्षेच्या दृष्टीने व धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता धरणातून आवश्यकतेनुसार टप्प्या-टप्प्याने आज १६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास १६ हजार ते १८ हजार क्युमेक्स पर्यंत विसर्ग सोडण्यात आला आहे.त्यानुसार विविध नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली व अनेक रस्ते बंद झाली.अशातच देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावापासून तीन किलोमटर अंतरावर पश्चिमेस असलेल्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले आहे.

कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांच्या जवळपास शेकडो हेक्टर शेती पुरबाधित झाल्याने उभे असलेले शेतातील संपूर्ण धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.संपूर्ण धानपिक नष्ट झाल्यास कित्येक शेतकरी बांधवांनी कर्ज काढून वखरणी,पेरणी,रोवणी व धानपिक होण्याची आशा बाळगून शेतीसाठी एकरी २० हजार रुपये खर्च केला.मात्र कृत्रीमरीत्या आलेल्या महापुराने शेतकरी बांधवांच्या सर्व आशेवर पाणी फेरल्या गेले आहे.पुरामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण धानपिक भुईसपाट होणार की काय?अशा वेळेस शेतकरी बांधवांनी काय करावे? असा विचार मनात घर करून सोडत आहे.

शेतीसाठी एकरी २० हजार रुपये खर्च करून शासन स्तरावरुन केवळ तुटपुंज्या स्वरूपात नुकसानभरपाई दिली जाते.शेतकरी बांधव कितीही राब-राब राबून नशीब फाटके ते फाटकेच असते.कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी अवकाळी पाऊस,कधी पावसाची कमतरता तर कधी पुराचा फटका व इतर अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. कृत्रिमरीत्या आलेल्या महापुराने कोंढाळा येथील शेतकरी बांधवांचे संपूर्ण धानपिक नष्ट झाल्यास यांस जबाबदार कोण? काही शेतकरी बांधवांनी धानपिका सोबतच तुर,भाजीपाला व इतर पिके लावली आहेत. अशातच पुराचा फटका बसल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!