Tuesday, June 23, 2026
Homeदेसाईगंजजुनी वडसा येथील कृषी पंपाचा खंडित पुरवठा सुरळीत करा.....- शेतकरी बांधव व...

जुनी वडसा येथील कृषी पंपाचा खंडित पुरवठा सुरळीत करा…..- शेतकरी बांधव व आपच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली मागणी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज :- नगर परिषद हद्दीमध्ये येणाऱ्या जुनी वडसा येथील शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा गेली दोन महिन्यांपासून खंडित असून गावातील शेतकरी बांधवांनी कित्येकदा याबाबत देसाईगंज विद्युत वितरण कंपनी यांना माहिती देऊनही याकडे कानाडोळा केला जात असल्याने जुनी वडसा येथील शेतकरी बांधव व देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता सारवे यांना कृषी पंपाचा खंडित पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा; याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

गावातील शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतातील धान पिकांना पाहिजे त्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान्य पाण्याअभावी करपून गेले होते.ज्या ठिकाणी दोन पोते धान्य व्हायचे त्या ठिकाणी एकच पोते धान्य झाल्याने; याची नुकसानभरपाई कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जुनी वडसा येथील शेतकऱ्यांनी देसाईगंज विद्युत वितरण कंपनीस अनेकदा सूचना देऊनही तसेच सामूहिकरित्या निवेदने सादर करुनही बंद पडलेले मीटर तसेच खंडित पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही.कार्यालयात सूचना दिल्यास चार दिवसांत वा आठ दिवसात आम्ही येऊ व दुरुस्ती करून देऊ; असे खोटे-नाटे सांगून पोकळ आश्वासने देऊन शेतकरी बांधवांची फसवणूक देसाईगंज विद्युत वितरण कंपनीद्वारे केले जात असल्याचे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.काल १२ जून २०२३ रोजी दिलेल्या निवेदनानुसार येत्या दहा दिवसांत खंडित पुरवठा सुरळीत करू; असे आश्वासन देण्यात आले.दहा दिवसांत कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यास पुढील दिवसांत आमरण उपोषणाचा इशारा जुनी वडसा येथील शेतकरी बांधव व देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!