- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाला आहे.अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथे घरातील कुलरमध्ये पाणी भरतांना विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून एकाचवेळी दोघांचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.भाग्यवान हरीचंद बावणे वय ४४ वर्षे व त्यांची भाची सुप्रिया सुरेश सोनटक्के वय १० वर्षे अशी मृतकांची नावे आहेत.
सध्या पावसाने दडी मारल्याने दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर उकाडा वाढला आहे.घरातील पंखे गरम हवा फेकत असल्याने अनेकांनी कुलर सुरू केले आहेत. कुलरची हवा ही पाण्याविना गरम फेकत असल्याने त्यात पाणी भरणे आवश्यक असते. कुलरची थंड हवा लागावी म्हणून सुप्रिया आणि तिचे मामा भाग्यवान बावणे हे घरातील कुलरमध्ये पाणी भरत होते.पाणी भरत असतांना कुलर बंद होता.पण कुलरची पिन ही बोर्डमध्ये लावलेली असल्याने कुलरच्या लोखंडी भागामध्ये विद्युत प्रवाह उतरला आणि दोघांनाही एकाचवेळी विजेचा जोरदार धक्का बसला.यात दोघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सुप्रिया ही गुमाधावडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होती. घटनेच्या दिवशी ती शाळेत गेली नव्हती,मात्र त्याच दिवशी तिच्यावर काळाने घाला घातला.सदरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी असल्याने कुलरमध्ये पाणी भरतांना नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे,कुलरमध्ये पाणी टाकायचेच झाले,तर बोर्डातील कुलरची पिन काढूनच पाणी भरावे.
- Advertisement -

