- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात तीन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी जनकापूर जंगल परिसरालगतच्या शेतात वाघाने हल्ला चढवून ५५ वर्षीय शेतकरी रमेश जयराम काशीवार यांना ठार केले होते.शेतकरी रमेश काशीवार हे दुपारच्या सुमारास जंगल परिसरालगत असलेल्या शेतावर गेले होते.दरम्यान,जंगल परिसरातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.शेतावर गेलेले रमेश काशीवार सायंकाळ होऊनही घरी परतल्याने नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.शोधादरम्यान ते शेतात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.ऐन शेतीकामांच्या हंगामात वाघाची दहशत लक्षात घेता वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी १५ वन कर्मचाऱ्यांचे विशेष पथक,तसेच वाघाची भ्रमंती नेमकी कोणत्या ठिकाणी व कोणत्या परिसरात आहे; यासाठी जंगल परिसर व आजूबाजूच्या परिसरात तब्बल आठ ट्रॅप कॅमेरे व दोन अत्याधुनिक लाइव्ह कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास डिजिटल नजर ठेवून माहिती घेतली जात आहे.दरम्यान,नागभीड प्रादेशिक वन विभागाच्या आरएफओ भारती बगमारे यांनी नागरिकांना जंगल परिसरात तसेच लगतच्या परिसरात एकटे न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
- Advertisement -

