चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील हरर्दोना गावाजवळ आज,शनिवार ११ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले असून या धक्क्याची तीव्रता ३.४ रिश्टर स्केलवर नोंदविण्यात आली.धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नाही.याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.त्याचबरोबर, चंद्रपूरसह मराठवाड्यातील परभणी,हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.तसेच विदर्भातील यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात देखील हादरले बसले.पुसद तालुक्यातील शेबाळ पिंपरी परिसरात सकाळी पावणे नऊ वाजता सौम्य हादरे जाणवले.तर वाशिम शहर आणि आजूबाजूच्या परिसरातही धक्के बसल्याचे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूरसह काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

