Sunday, May 31, 2026
Homeबीडभीषण अपघातात तहसीलदाराचा मृत्यू..!

भीषण अपघातात तहसीलदाराचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनावरील अचानकपणे नियंत्रण सुटून बीड जिल्ह्याच्या केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.सदरची दुर्घटना ही लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ घडली.एका कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाने राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महसूल विभागाने शोक व्यक्त केला आहे.
आज पहाटेच्या सुमारास तहसीलदार राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते.पहाटे पाचच्या  सुमारास रेणापूर फाट्याजवळ येताच त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले.यात कार रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाली.अपघाताची तीव्रता इतकी बिषण होती की,त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताच्या वेळी गाडीत ते एकटेच होते.पहाटेची  वेळ असल्याने परिसरात फारशी वर्दळ नव्हती.मात्र, अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला आहे.दुर्दैवी घटनेमुळे प्रशासन आणि स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!