नागपूर :-जीवनाचे काही खरं नाही.त्यामुळे माझा- माझा म्हणून मोठा गाजावाजा करू नका,जीवन हे नश्वर आहे; त्यावर कुणाचाही ताबा नाही,कधी काय होणार हे सांगताच येत नाही; अशी संतांची शिकवण होती आणि ती पत्यक्ष नजरेसमोर घडतांना दिसून येत आहे.अश्याच प्रकारे नेहमीप्रमाणे सकाळी उठून फिरायला जाणे आणि न्यायालयात उपस्थित राहून आलेल्या केसेस हाताळण्याची दिनचर्या असणाऱ्या वकिलाच्या छातीत न्यायालयातील पायऱ्या चढत असतांनाच अचानकपणे कळ आली आणि ते खाली कोसळले.यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ॲड.अंकुश पानतावणे वय ६४ वर्षे, रा.वकीलपेठ,नागपूर असे मृत पावलेल्या वकिलाचे नाव असून ते दोन दिवसांपूर्वी नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारांसाठी चंद्रपूरला गेले होते आणि त्याच रात्री चंद्रपूरहून नागपूरला परतले. त्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळी उठून चालायला गेले आणि दुपारी साडे बाराच्या सुमारास कुटुंब न्यायालयात गेले.न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावर पायऱ्या चढत असतांना त्यांच्या छातीत कळ आली व ते खाली कोसळले.त्यानंतर,प्राथमिक उपचार करून त्यांना रविनगरातील रुग्णालयात नेण्यात आले.परंतु, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. आज,गुरुवार २६ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता नागपूरच्या वकीलपेठ येथील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघून मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.घडलेल्या दुर्दैवी घटनेने वकील क्षेत्रासह इतर क्षेत्र शोकमग्न होऊन परिसरात शोककळा पसरली आहे.
अचानक छातीत कळ आली आणि पायरीवरच कोसळले; वकीलाचा दुर्दैवी मृत्यू..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

