Friday, July 17, 2026
Homeनागपूरचार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने काल शनिवारी नागपुरात तिघांचा जीव घेतल्याने अवघ्या चार दिवसांत उष्माघातामुळे तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला आहे.या तिघांचे मृतदेह शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले आहेत. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोब्रागडे चौकाजवळील जयदीप सोसायटीसमोर पदपथावर सकाळी एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला.त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.यापूर्वी जरीपटक्यातील एका बसथांब्याजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळला होता.त्याला रुग्णालयात नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला,तर तिसरा मृतदेह सीए रोडवरील एका दागिन्यांच्या दुकानासमोर रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आला.तिन्ही मृतांची ओळख पटलेली नाही.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.मात्र,वाढत्या उन्हामुळेच यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नवतपाचा कार्यकाळ २ जून रोजी संपुष्टात येणार असल्याने हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार येत्या २४ तासांत आज,रविवार ३१ मे पर्यंत नागपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.पावसाळी वातावरण ३ जूनपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तापमानात आणखी दोन ते चार अंशांची घट होईल,असा अंदाज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!