Tuesday, September 8, 2026
Homeनागपूरचार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने काल शनिवारी नागपुरात तिघांचा जीव घेतल्याने अवघ्या चार दिवसांत उष्माघातामुळे तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला आहे.या तिघांचे मृतदेह शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले आहेत. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोब्रागडे चौकाजवळील जयदीप सोसायटीसमोर पदपथावर सकाळी एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला.त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.यापूर्वी जरीपटक्यातील एका बसथांब्याजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळला होता.त्याला रुग्णालयात नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला,तर तिसरा मृतदेह सीए रोडवरील एका दागिन्यांच्या दुकानासमोर रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आला.तिन्ही मृतांची ओळख पटलेली नाही.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.मात्र,वाढत्या उन्हामुळेच यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नवतपाचा कार्यकाळ २ जून रोजी संपुष्टात येणार असल्याने हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार येत्या २४ तासांत आज,रविवार ३१ मे पर्यंत नागपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.पावसाळी वातावरण ३ जूनपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तापमानात आणखी दोन ते चार अंशांची घट होईल,असा अंदाज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!