- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-देशातील जनता महागाई,बेरोजगारी,इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असतांना केंद्रातील सरकार धार्मिक ध्रुवीकरण आणि इव्हेंटबाजीच्या माध्यमातून अपयश लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारीसारख्या मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजप हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून समाजात धार्मिक तेढ पसरवत आहे.सरकारकडे जनतेला दिलासा देण्यासाठी कोणतीही ठोस योजना उरलेली नाही.मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करीत असतांनाही सरकारकडून केवळ आश्वासनांची धूळफेक केली जात आहे.शासनाकडून जीआर काढले जातात,मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.अनेक ठिकाणी वाहनांचे आरसी बुक पाहून डिझेल दिले जात आहे.शेतकऱ्यांना डिझेलची गरज असतांना अशी परिस्थिती निर्माण होणे गंभीर बाब आहे.काही दिवसांत देशात लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होऊ शकते.नजीकच्या काळात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १७० रुपये आणि डिझेलचे दर १५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.मध्यमवर्गीय,शेतकरी आणि सामान्यांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
- Advertisement -

