Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरमुले चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३ लाख ५० हजारात मुलाची विक्री.. - रेल्वे...

मुले चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३ लाख ५० हजारात मुलाची विक्री.. – रेल्वे स्टेशनवरून साडेतीन वर्षाच्या बालकाचे केले होते अपहरण; पाच महिला आरोपी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील रेल्वे स्टेशन परिसरातून साडेतीन वर्षाच्या बालकाचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.विशेष म्हणजे,मुलाच्या आईला मध्यरात्री जाग आली तेव्हा मुलगा शेजारीच झोपलेला होता.अश्यातच वडिलांना पहाटे जाग येताच मुलगा गायब झाल्याने एकच खळबळ माजली होती.प्रकरणी राजन कुंजाम रा.केसरी टोला, ता.अंबागड चौकी,जि.राजनांदगाव, छत्तीसगड यांनी काल शनिवारी सकाळी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.लागलीच चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची सात विशेष पथके तयार केली. शंभर पेक्षा अधिकची सीसीटिव्ही फुटेज तपासून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले.फुटेजची तपासणी करीत असतांना  काही संशयास्पद हालचाली दिसल्या.दरम्यान, एका चारचाकीने मुलाला घेऊन तेलंगणा राज्यात गेल्याचे निष्पन्न होताच पथके तेलंगणा राज्यात रवाना करून अवघ्या वीस तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.आज,रविवार १ मार्च रोजी पाच महिला आरोपींना तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथून अटक करण्यात आली आहे; तर यातील दोन पुरुष आरोपी अद्याप फरार आहेत.आरोपींमध्ये लावण्या कुमारस्वामी कोणा वय ३४ वर्षे,सातक्का चंद्रया करेरे वय ५० वर्षे रा.मंथनी,मंचेरियल,तेलंगणा व राणी पसनोटी वय ३० वर्षे,संगीता पानंगणती वय ४० वर्षे आणि ऐलक्का बुद्दे वय ६० वर्षे,सर्व राहणार मंचेरियल,तेलंगणा असे अटकेतील आरोपी महिलांची नावे असून अन्य दोन जणांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. मुलगा सुरक्षित असून आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आला आहे.प्रकरणी आरोपी महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मुलाला ३ लाख ५० हजार रुपयांना विकण्याचा सौदा करण्यात आल्याचे सांगितले आहे. तेलंगणातील ऐलक्का बुद्दे,राणी पसनोटी,संगीता पानंगणती या महिलांनी दोन पुरुष साथीदारांसह बल्लारपूर रेल्वेस्थानकावर असलेल्या त्या मुलाच्या आई-वडिलांवर पाळत ठेवली होती.मध्यरात्री ते गाढ झोपेत असतांना संधी साधून त्या मुलाचे अपहरण करून मंचेरियल गाठले.तिथे सातक्का करेरे आणि लावण्या कोणा या महिलांना ३ लाख ५० हजार रुपयांत विक्री केली.घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे,परीविक्षाधिन सहाय्यक पोलिस अधीक्षक गौरव कायंदेपाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, बल्लारपूरचे ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकेडवार,बलराम झाडोकार,पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी केली.
  • झोपेत असतांना चिमुकल्याला नेले चोरून👇
राजन कुंजाम हे पत्नी,साडेतीन वर्षाचा मुलगा व ५ महिन्यांच्या मुलीसह मागील आठ महिन्यांपासून बल्लारपूर रेल्वे परिसरातील गणपती शेडमध्ये वास्तव्यास होते.ते यापूर्वी रेल्वे बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते.मात्र,सध्या काम बंद झाल्याने रेल्वे स्टेशन परिसरात प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विक्री करून उदरनिर्वाह करत आहेत.राजन कुंजाम यांची पत्नी रात्री सुमारे २ वाजता जागी झाली,तेव्हा मुलगा त्यांच्या जवळ झोपलेला होता.मात्र,पहाटे चार वाजता कुंजाम जागे झाले असता,मुलगा शेजारी नसल्याचा दिसून आला. परिसरात शोधाशोध केली; मात्र मुलाचा कुठेही थांगपत्ता लागला नसल्याने राजन कुंजाम यांनी बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!