Monday, July 27, 2026
Homeभंडारादोन शेतकऱ्यांनी कर्जापायी एक दिवसा आड गळफास लावून केली आत्महत्या- लाखांदूर तालुक्यातील...

दोन शेतकऱ्यांनी कर्जापायी एक दिवसा आड गळफास लावून केली आत्महत्या- लाखांदूर तालुक्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा(लाखांदूर) :- शेतकरी बांधवांच्या व्यथा कोण ऐकणार? कधी सततची नापिकी,अवकाळी पाऊस,गारपीट, किडीचा प्रादुर्भाव,मालाला योग्य हमीभाव नाही,बँकांचे कर्जाचे डोंगर व इतर अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसंदिवस वाढतच चालले जात आहे.अशाच प्रकारे लाखांदूर तालुक्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी शेतशिवारातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अनुक्रमे शुक्रवारी व शनिवारी घडली.असल्याने दोन्ही गावात शेतकरी आत्महत्या मुळे शोककळा पसरली आहे.

सुधाकर लक्ष्मण मेश्राम वय ६२ वर्षे रा. पिंपळगाव कोहळ, सारंगधर विठोबा मेश्राम वय ६० रा.किरमटी अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.१७ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सुधाकर मेश्राम यांनी दोन वर्षापासूनची नापिकी व कर्जाच्या तणावातून शेतशिवारातील झाडाला दोराने गळफास लावून आत्महत्या केली.सुधाकर यांच्या नावे पावणे दोन एकर शेती असून सोसायटीचे कर्ज असल्याची माहिती आहे.तर दुसऱ्या घटनेत किरमटी येथे घरासाठी घेतलेले कर्ज फेडणे डोईजड झाल्याने शनिवारी १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सारंगधर विठोबा मेश्राम याने शेतशिवारात फणसाच्या झाडाला दोराने गळफास लावून आत्महत्या केली.पोलिस सूत्रानुसार,त्यांच्यावर खासगी फायनान्स कंपनीचे १ लाख ३० हजार रुपयांचे व इतर खासगी कर्ज असल्याची माहिती आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!