- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर-बीट परिसरात बांबू कापत असतांनाच बिबट्याने अचानकपणे हल्ला चढवला.यात साहजू चमरू बिलठेरिया वय ६३ वर्षे,मूळ गाव रा.प्रतला, जि.मंडला,मध्य प्रदेश यांचा मृत्यू झाला असून ते अडेगाव जंगल परिसरात बांबू कटाईचे काम करीत होते.मोहर्ली वनपरिक्षेत्रातील अडेगाव गावालगतच्या कक्ष क्रमांक-१८१ मध्ये काल गुरुवारच्या सकाळी मजुरांच्या वतीने बांबू कटाई सुरू होती.सर्वजण बाबू कटाई करण्यात व्यस्त होते.अश्यातच जंगल परिसरातून आलेल्या बिबट्याने साहजू यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवला.हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली,पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळताच मोहर्ली (प्रादेशिक)चे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच दुर्गापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप एकाडे व पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिस व वनविभागाच्या संयुक्त पथकाने पंचनामा व मोका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविला. प्रसंगी मृतकाच्या नातेवाइकांना तात्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात केवळ यंदा २०२५-२६ मध्ये आतापर्यंत वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ४५ जणांचा मत्यू झाला असून वाघाने ४१ जणांना,बिबट्याने दोघांना,हत्ती आणि अस्वलाने प्रत्येकी एक बळी घेतला आहे.
- Advertisement -

