- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील बुटीबोरी येथील नवीन एमआयडिसी परिसरातील अवाडा कंपनीत एका पाण्याच्या टाकीचे बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू असतांनाच टाकी कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार १९ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. घडलेल्या अपघातात टाकीचे बांधकाम करणारे मजूर मलब्याखाली दबल्या गेले.लागलीच परिसरातील कामगार मदतीला धावले.एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला असून जखमींना तातडीने बुटीबोरी रुग्णालयात दाखल करण्यात आले.सात ते आठ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील बुटीबोरी येथील नवीन एमआयडिसी परिसरात अवाडा कंपनीचे निर्माणाधिन कार्य सुरू आहे.बुट्टीबोरी येथील अवाडा ही सोलर पॅनल तयार करणारी कंपनी आहे.या कंपनीमध्ये एक टाकी तयार करण्यात येत होती.याचे काम अंतिम टप्प्यात असतांनाच टाकी कोसळली अन् अनेकजण मलब्याखाली दबले गेले.जखमी कामगारांवर बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सर्व जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
- Advertisement -

