Monday, September 7, 2026
Homeनागपूरमॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.विशेष म्हणजे,विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात नोंदवली गेली आहे.येथे ३५.१ अंशांची नोंद करण्यात आली आहे; तर नागपूरच्या कमाल तापमानात साडेतीन अंशांची वाढ झाली. नागपूरचे तापमान ३३.४ अंश असून सध्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अलर्ट नसल्याने हवामान कोरडे राहून तापमानात वाढ होणे आहे.उद्याला केवळ गडचिरोली जिल्ह्यासाठी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि मॉन्सून ट्रफ कमजोर झाल्यामुळे अनेक भागांतून ढगांची दाटी कमी झाली असून,पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.’एल निनो’ प्रभावामुळे
यंदाचा ऑगस्ट महिना कोरडा गेला.सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने उन्हाळ्यासारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.विदर्भ,मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात पाऊस ओसरल्यामुळे थेट सूर्यप्रकाश पडेल आणि कमाल तापमानात वाढ होईल.पावसाच्या विश्रांतीमुळे हवेतील आर्द्रता आणि वाढलेले तापमान यांमुळे नागरिकांना उष्ण व दमट वातावरणाचा त्रास जाणवू शकतो.त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!