- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.विशेष म्हणजे,विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात नोंदवली गेली आहे.येथे ३५.१ अंशांची नोंद करण्यात आली आहे; तर नागपूरच्या कमाल तापमानात साडेतीन अंशांची वाढ झाली. नागपूरचे तापमान ३३.४ अंश असून सध्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अलर्ट नसल्याने हवामान कोरडे राहून तापमानात वाढ होणे आहे.उद्याला केवळ गडचिरोली जिल्ह्यासाठी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि मॉन्सून ट्रफ कमजोर झाल्यामुळे अनेक भागांतून ढगांची दाटी कमी झाली असून,पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.’एल निनो’ प्रभावामुळे
यंदाचा ऑगस्ट महिना कोरडा गेला.सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने उन्हाळ्यासारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.विदर्भ,मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात पाऊस ओसरल्यामुळे थेट सूर्यप्रकाश पडेल आणि कमाल तापमानात वाढ होईल.पावसाच्या विश्रांतीमुळे हवेतील आर्द्रता आणि वाढलेले तापमान यांमुळे नागरिकांना उष्ण व दमट वातावरणाचा त्रास जाणवू शकतो.त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
- Advertisement -

